खानापूर

जळगेनंतर कौंदल हादरलं: हत्तींच्या उपद्रवाने शेतकऱ्यांची झोप उडाली!

खानापूर:   जळगे करंबळ गावात धुमाकूळ घातलेल्या हत्तीला पकडण्याची बातमी ताजी असताना कौंदल गावात नव्या हत्तींच्या उपद्रवाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नागेश भोसले यांच्या शेतातील नारळ, केळीची झाडे, सागवानाची रोपे आणि भाजीपाला उद्ध्वस्त झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेचा तपशील:
मंगळवार, 14 जानेवारी रोजी नागेश भोसले शेतात गेले असता, त्यांनी नारळ आणि केळीची झाडे मुळासकट उखडून फेकलेली व मोडलेली पाहिली. भाजीपाला पिकाचेही नुकसान झाल्याचे दिसून आले. निरीक्षण करताना त्यांना हत्तींच्या तीन प्रकारच्या पायांचे ठसे आढळले. त्यामुळे तीन हत्तींच्या वावराचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांनी तातडीने ही माहिती वन खात्याला दिली.

गेल्या काही दिवसांतील पार्श्वभूमी:
चार दिवसांपूर्वी जळगे गावात शिमोगाहून आणलेल्या हत्तीने शेतीचे नुकसान केल्याची घटना घडली होती. वन खात्याने त्या हत्तीला जेरबंद केले होते. मात्र आता पुन्हा कौंदल परिसरात हत्तींच्या उपस्थितीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या